Featured
- Get link
- X
- Other Apps
बस झालं , आता शांत बसून आपल्याच देशाचं , आपल्या डोळ्यासमोर वाटोळं होताना बघणं हा नाकर्तेपणा आहे आणि तो नाकर्तेपणा मी करू शकत नाही.
"God's own country "
बस झालं , आता शांत बसून आपल्याच देशाचं , आपल्या डोळ्यासमोर वाटोळं होताना बघणं हा नाकर्तेपणा आहे आणि तो नाकर्तेपणा मी करू शकत नाही. आ.जितेंद्र आव्हाड
पाहूया आणखी काय म्हणाले आ.जितेंद्र आव्हाड
दिल्लीमध्ये कधीही गेलात; कुठल्याही कार्यालयात जा, कुठल्याही मंत्रालयात, कुठल्याही मंत्र्यांच्या कार्यालयात जा; चार खासगी सचिवांमधील एक खासगी सचिव हा "मल्लू" असतो. म्हणजेच तो केरळमधून आलेला असतो. पहिल्यांदा केरळची समृद्धी ही तिथल्या उपासमारीमुळे आली. शिक्षण घेत, आपल्याकडे नोकऱ्या नाहीत, असे म्हटल्यावर ते जगाच्या पाठीवर जायला निघाले. मुंबईत आले... मुंबईतही त्यांनी आपला चांगला जम बसवला. काही राजकीय हालचालींमुळे मुंबईत येण्याचा त्यांचा वेग कमी झाला व त्यांनी दिल्ली गाठायला सुरूवात केली. आजमितीला दिल्लीतील सर्व महत्वाच्या कार्यालयांमध्ये , सर्व महत्वाच्या जागांवर जेवढे उत्तर भारतीय आहेत , तेवढेच मल्लू आहेत. त्यांनी या जागा दादागिरीवर नाही तर आपल्या हुशारीने आणि मेहनतीवर कमावल्या.
आपण जेव्हा मध्य आशियातील कोणत्याही देशात जा, दुबईपासून सौदी अरेबियापर्यंत! तिथेही आपल्या लक्षात येईल की जगातील कोणत्याही जाती-धर्मापेक्षाही जास्त मल्लू लोकांची जास्त चालते. त्यांनी ते ही दरवाजे या देशात सर्वात आधी उघडले आणि तिथून पैशाचा मार्ग मोकळा झाला व केरळ हळूहळू श्रीमंत होऊ लागले. पण, त्या श्रीमंतीत गर्वाचा दर्प नव्हता. तर त्यांनी त्याचा वापर चांगल्या पद्धतीत शिक्षणासाठी केला. आज केरळ भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून पुढे येतंय. आज तिथे ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम हे तिघेही संख्येने कमी अधिक प्रमाणात सारखेच असले तरी तिथे कधीही टोकाचे जातीयवाद झाल्याचे दिसत नाही. त्याचे एक कारण म्हणजे भाषा! धर्म कोणताही असो, जात कुठलीही असो, तिथे एकच भाषा बोलली जाते. ती म्हणजे मल्याळम!! त्या भाषेच्या समानतेमुळे तिथे धर्माची वेगळी ओळख कधी होऊच शकली नाही.
आजमितीला तिथे बालमृत्यूचा दर फक्त सहा आहे. उलट उत्तर प्रदेशात 46 आहे. दूरदेशातून जे परकीय चलन भारतात येते. त्यातील 36 टक्के चलन हे केरळमधील परदेशी असलेले अनिवासी भारतीय पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.34 लाख कोटी रूपये पाठविले होते.दरडोई उत्पन्न हे भारताच्या सरासरीपेक्षा 60% अधिक आहे. याचा अर्थ तेथील माणूस हा इतर राज्यातील नागरिकांपेक्षा श्रीमंत आहे. दारिद्रय़रेषेखालील भारताची सरासरी जेव्हा 22 आहे. तेव्हा तिथे फक्त 0.76 लोकं हे दारिद्रय़रेषेखाली आहेत.
आज समुद्र किनाऱ्याचा विकास सर्वाधिक केरळने केलाय. खाडीमध्ये पर्यटन ही संकल्पनाच केरळमधून आलीय. ते एक राज्य ज्याने कधीच जाती धर्माला वाव दिला नाही. म्हणून आजही तिथे एकतर कम्युनिस्ट पार्टी निवडून येते किंवा काँग्रेस पक्ष निवडून येतो. इतर कुठल्याही पक्षाला त्यांनी कधीच केरळमध्ये स्थान दिले नाही. केरळ स्टोरी हा सिनेमा आता प्रदर्शित झाला आहे, त्याचे मूळ यातच आहे. 32 हजार मुलींचे धर्मांतर किंवा पलायन हा निव्वळ खोटारडेपणा होता. कारण अधिकृत आकडा फक्त तीन आहे. तीन कुठे आणि 32 हजार कुठे?
लोकांनी सिनेमा पहावा, यासाठी त्याचा राजकीय वापर करायचा आणि खोटं लोकांसमोर घेऊन जायचे. एका राज्यातील महिला- भगिनींना बदनाम करायचे. हे या देशाचे दुर्दैव आहे. दुर्दैवाने आपल्या कधीच लक्षात आले नाही की आपल्या इथे पुरूष प्रधान संस्कृती आपण मारूच शकलो नाही. इथल्या माय भगिनींना मूर्खात काढणे, त्यांना अक्कलच नाही, असे दाखविणे, यातच आपण आपणाला कर्तृत्ववान समजतो. पण, देशभरात पसरलेले आयएएस, अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेच्या जाळ्यापैकी सर्वाधिक महिला आयएएस अधिकारी या केरळमधून येतात. इंग्रजीत सर्वात जास्त पीएचडी ही केरळमधील महिलांनी केली आहे. ते आर्यन संस्कृतीपासून वेगळे असून ते स्वतःला द्रविडीयन मानून घेण्यात मोठेपणा मानतात. त्यांना आर्यन संस्कृतीच मान्य नाही. हा या देशातला सर्वात मोठा फरक आहे. आणि स्वतःला द्रविड म्हणून घ्यायला त्यांना कमीपणाही वाटत नाही. सर्वात पहिली मस्जिद केरळमध्ये उभी राहिली, सर्वात पहिले चर्च; अनेक चर्चेस ही पाचशे- सातशे वर्ष जुनी आहेत. तसेच हिंदू देवालयांनादेखील खूप प्राचीन इतिहास आहे. असा हा निसर्गसुंदर केरळ, ज्याला इंग्रजीत God's own country असे म्हटले जाते. त्या राज्याला बदनाम करण्याची जी मोहीम राजकारणासाठी सुरू झाली आहे ती अतिशय घृणास्पद आहे. भारताचे असलेले सौंदर्य हे तेथील विविधतेत आहे. ही विविधता आपण बदनाम करणार असू आणि संपवणार असू तर आपण भारत संपवायला निघालो आहोत, हे विसरू नका. जे सत्य आहे ते स्वीकारायला शिकणे आणि समोरच्यालाही समजावणे हे आपले काम आहे. केरळवर जो सिनेमा निघाला आहे तो खोट्याच्या अधिष्ठानावर आहे. अन् खोट्याच्या अधिष्ठानावर असलेली कुठलीच गोष्ट कधीही टिकू शकत नाही. सत्य बाहेर येईलच आणि आता ते आलंच! ज्याला कोणाला याच्यावर चर्चा करायची असेल त्याच्याशी चर्चा करायला मी तयार आहे.
बस झालं , आता शांत बसून आपल्याच देशाचं , आपल्या डोळ्यासमोर वाटोळं होताना बघणं हा नाकर्तेपणा आहे आणि तो नाकर्तेपणा मी करू शकत नाही. कोणाला माझ्याविषयी काय मत करून घ्यायचे ते करून द्या. पण मी या देशाचा सुजाण आंबेडकरी विचारांचा नागरिक आहे. संविधानाला मानणारा!
*डॉ. जितेंद्र आव्हाड*
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment